Maharashtra Farmer Loan waiver:राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अंतिम घोषणा ३० जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. याबाबत आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नवी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, परदेशी कमिटीचा अहवाल……
कर्जमाफी बाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे. त्यानंतर ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येईल, असे ते म्हणाले.
Hsrp नंबर प्लेट ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड HSRP Number Plate Last Date
कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा निश्चित करणार असून कोणत्या घटकांचा समावेश करायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहे. “एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळाल्यावर आम्ही कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर मोठा परिणाम झाला असून १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. १ कोटी २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत २८ जीआर काढले आहेत. नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केवायसी प्रक्रियेवरही युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.
कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळेल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. परदेशी कमिटीचा अहवाल हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असून त्यावर आधारित कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कर्जमाफी प्रत्यक्षात लागू होण्याची तारीख स्पष्ट झाल्याने राज्यातील शेतकरीवर्गात अपेक्षांचे वातावरण असून ३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा वास्तवात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, दत्ता भरणे हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दलची ही महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. कृषीमंत्र्यांच्या या माहितीनंतर कर्जमाफीची आस लागलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं जाणकारांचं मत आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा